Showing posts with label MArathi Books. Show all posts
Showing posts with label MArathi Books. Show all posts

Monday, May 11, 2020

Pu. La. Deshpande (पु. ल. देशपांडे) - Plays ( नाटकं)

तुका म्हणे आता (Tuka Mhane Ata) – 1948

Buy Tuka Mhane Aata ( ) Book Online at Low Prices in India | Tuka ...

पुढारी पाहिजॆ (Pudhari Pahije) – 1951
पुढारी पाहिजे-Pudhari Pahije by P. L. Deshpande - Sun ...

अंमलदार (Ammaldar) – 1952...based on Nikolai Gogol's Inspector General
अंमलदार-Anmaldar by P. L. Deshpande - ShreeVidya Prakashan ...
भाग्यवान (Bhagyawan) – 1953
Bhagyavan by P. L. Deshpande - book Buy online at Akshardhara
तुझें आहे तुजपाशीं (Tujhe Ahe Tujapashi) – 1957
Suyash Book gallery: Buy तुझें आहे तुजपाशीं ...
सुंदर मी होणार (Sundar Mi Honar) – 1958
Sundar Mi Honar (सुंदर मी होणार) by P L Deshpande
पहिला राजा/आधे अधूरे (Pahila Raja/adhe Adhure) – 1976...based on Jagadish Chandra Mathur's Adhe Adhure

तीन पैशांचा तमाशा (Teen Paishancha Tamasha) – 1978...based on Bertolt Brecht's The Three Penny Opera'
तीन पैशाचा तमाशा-Tin Paishacha Tamasha by P. L. ...
ती फुलराणी (Ti Fulrani) – based on George Bernard Shaw's Pygmalion
ती फुलराणी [Tee Phulrani] by P. L. Deshpande [ पु. ल ...
वाऱ्यावरची वरात (Varyavarchi Varaat)
Varyavarchi Varaat DVD
एक झुंज वार्‍याशी (Eka Jhunja Waryashi)
Ek Jhunja Varyashi by P. L. Deshpande - book Buy online at Akshardhara








Monday, March 11, 2013

Book Quotes: KAHI KHARA KAHI KHOTA






१. आयुष्यातल्या कोणत्याही सुखाला कवटाळून झाल्यावर त्या क्षणांच्या आठवणीने चोरटेपणा न वाटता जास्त आनंदच जेव्हा वाटत राहतो तेच खरं सुख.

२. देव पाठीराखा असतो तेव्हाच असामान्य संकटं येतात. सामान्य संकटं निवारण्यात त्याचही देवत्व सिद्ध होणार नाही.

३. कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम बघितला जात नाही, त्याचं चाक जमिनीत कधी रुततं तिकडेच सगळ्यांच लक्ष असतं.

४. वारंवार प्रकट झाल्याशिवाय जे शांत होत नाही किंवा वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच शल्य म्हणतात.







Author : – Va. Pu. Kale
Book : - Kahi Khare Kahi Khote…









Sunday, February 24, 2013

Book Quotes "Toch Chandrama"

१. सारे जरि ते तसेच धुंदी आज ती कुठे?
    मीहि तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे?
    ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
    एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

२. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
     अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
     जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्याला
     माझ्या मनातला का तेथे असेल रावा?

३. काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
    मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे!

४. मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
     घर पान्यामंदी बंदराला करतो ये जा!



Author : – Shanta Shelake
Book : - Toch Chandrama…
 
 
 
 
 
 
 
 

Monday, February 04, 2013

Book Quotes -VYAKTI AANI VALLI

१. मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांचे 'भय्या' आणि 'मद्राशी' असे दोन स्थल विभाग मी करू शकतो. विभाग जरा स्थूल वाटला तर 'वानियाभय' असेल असा अंदाज. ह्या वानियाभायामध्ये मारवाड, गुजरात, बंगाल सारे येतात. 'शीख' ओळखता येतो; पण कालचा शीख आज ओळखता येत नाही."

२. "अहो कसला गांधी? जगभर गेला; पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमकं ठाऊक इथं त्याच्या पंच्याच कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्यापेक्षाही उघडे! शुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटीश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील कधी घाबरला नाही! तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं! इथे निम्मं कोकण उपाशी! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक, आम्हास कसलं"?



Author : – Pu. La. Deshpande
Book : - Vyakti Aani Valli
































Saturday, January 19, 2013

Book Quotes: VIDHAVAKUMARI

१. खोटं म्हणजे काय?
    जे माणसाला सुचतं, पण देवाला रुचत नाही ते खोटं.









Author : – Mama Varerkar
Book : - VIDHAVA KUMARI


















Sunday, January 06, 2013

Vapurza ... 18

Book Quotes - AMRUTVEL

१. स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे; पण माणसाचं मोठेपण, आपल्या वाटेला आलेलं सारं दु:ख पाहून नवी स्वप्न पाहण्यात आहे... हलाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
२. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो! पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही, अशी एक अंध, अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने! वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात. तसेच या अफाट जगात घडते.
३. जगात दोन जाती आहेत माणसांच्या. एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड मनांची. मुर्दाड माणसं अष्टौप्रहर जगण्याची केविलवाणी धडपड करत राहतात. ती कुणाच्याही लाथा खातील, सोम्यागोम्यापुढे लोटांगण घालतील. उकिरड्यावर उष्ट्या अन्नांनी पोट भरतील; पण काही करून कुडीत जीव राहील, अशी काळजी घेतील. त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं! मनस्वी मनं तशी नसतात. मनानं आणि अभिमानानं जगता आलं, तरच ती जगतील. ती धुंदीत जगतील, मस्तीत जगतील; पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशीसुद्धा तडजोड करणार नाहीत. त्यांची स्व:तशी तर सदैव झुंज चाललेली असते.
४. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत  नाही. 
 
Author : – Vi. Sa. Khandekar
Book : - Amrutvel
 
 
 
 
 
 
 
 

Thursday, December 27, 2012

Book Quotes "Bai Bayako Aani Calendar"

१. दात जिभेला म्हणतात,
 'हम बत्तीस तू अकेली, बसी हमारी माय..
 जरासी कतर खाउं तो फिर्याद कहां ले जाय?'
त्यावर जीभ म्हणते,
 'मानती हुं मैं अकेली, तुम बत्तीस, बसी तुम्हारी माय
जरासी तेढी बात करूं तो बात्तीसही गिर जाये.'



Author : – Va. Pu. Kale
Book : - Bai, Baiko, Calendar









Friday, December 21, 2012

Book Quotes - "SAMPURNA BALAKRAM"

१. आम्हा पौर्वात्यांच्या आणि पाश्चात्य इंग्रजांच्या आचार विचार कल्पनांत जे दक्षिनोत्तर अंतर आहे ते लक्षात येते. इकडे आम्ही 'गरजवंताला अक्कल नाही' असे म्हणतो, तर तिकडे इंग्रज लोक 'गरज हि शोधाकतेची आई आहे!' आस्व त्याबरहुकूम गरजेचा मारा चुकवितात आणि उलट 'अक्क्ल्वान्ताला गरज नसते' असा व्यत्यास सिद्ध करून दाखवितात.
2. His Verticality Went into His Horizontility” साधा अर्थ तो पडला.
 
 
 
Author : – Ram Ganesh Gadakari
Book : - Sampurna Balakram
 
 
 
 
 
 
 
 

Vapurza .. 13

Wednesday, December 12, 2012

Book Quotes - YAYATI

१. प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी.
२. जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी! त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.
३. या जगात जो तो आपापल्याकरीता जगतो, हेच खरे, वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात. तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते; पण खरोखरचं ते आत्माप्रेम असते. एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला, तर वृक्षवेली सुकून जात नाहीत; त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे.. मग तो जवळ असो, नाही तर दूर असो, हे पाहू लागतात. तो शोधून ती टवटवीत राहतात.
 
 
 
४. दैव हे मोठं क्रूर मांजर आहे. माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असावा. 
५. कुणाचही दु:ख असो ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे, तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहो, अशी कल्पना करणं हा.
६. मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी, आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रियं हे घोडे, उपभोगांचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रीय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.
७. इंद्रियं हे या शरिर रथाचे घोडे होत. कारण त्यांच्यावाचून तो क्षणभरसुद्धा चालू शकणार नाही. रथाला नुसते घोडे जुंपले, तर ते सैरावैरा उधळून रथ केव्हा कुठल्या खोल दरीत जाऊन पडेल आणि त्याचा चक्काचूर होईल याचा नेम नाही; म्हणून इंद्रिय रुपी घोड्यांना मनाच्या लागमच सतत बंधन हवं; पण हा लगाम देखील सतत सारथ्याच्या हातात असायला हवा! नाही तर तो असून नसून सारखाच! म्हणून मनावर बुद्धीच नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. अशा रीतीने रथ नीट चालेल; पण त्यात रथीच नसेल तर शेवटी रथ जाणार कुठे? त्याचं कार्य काय? सर्व मानवांत वास करणारा आणि आपल्यापैकी प्रत्येकात 'मी' च्यारुपाने असतो, तो आत्माच या शरीररुपी रथातला रथी होय.
८. या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे.
Author:– Vi. Sa. Khandekar
Book:- YAYATI










+1

You Tube